उगीच काहीतरी येत राहतं मनात.. तेच लिहून घेतो पटकन इथे.. मनातलं पानांत (डायरीच्या ) आणि पानांतल मनात करत राहण्या पेक्षा हे बराय आपलं..
हे तुझं बरं असतं...
बोलणंच टाळलं, की पुढचे प्रश्न टाळता येतात त्यांच्या उत्तरांसकट..
मग पुढचं सगळंच टाळता येतं.. आशा, अपेक्षा, आर्जवं, विनंत्या.... आणि भेट...
सगळंच..